top of page

डॉ.तात्यासाहेब नातू स्मृति प्रतिष्ठान, मार्गताम्हाने,  

ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, महाराष्ट्र 

डॉ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठान विषयी -
 

न्यासाची स्थापना - 
● पार्श्वभूमी आणि प्रेरणा
प्रेरणास्थान : कै. आमदार डॉ. श्रीधर दत्तात्रय ऊर्फ तात्यासाहेब नातू.
मूळ उद्देश: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. या उदात्त हेतूने डॉ. तात्यासाहेब नातू यांनी ग्रामीण भागात अनेक शैक्षणिक संस्थांची मुहूर्तमेढ रोवली.

● स्थापना वर्ष: सन १९९२

स्थापनेचे कारण: दिनांक २५ जुलै १९९२ रोजी डॉ. तात्यासाहेब नातू यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, त्यांनी पाहिलेले शैक्षणिक स्वप्न आणि त्यांच्या अपुऱ्या कार्याचा वारसा अविरतपणे पुढे चालविण्याच्या उद्देशाने त्यांच्या हितचिंतकांनी एकत्र येऊन त्यांच्या नावाने या प्रतिष्ठानची स्थापना केली  

● संस्थेचा विस्तार आणि वाटचाल 

१९९२ मध्ये स्थापन झालेल्या या न्यासाने अल्पावधीतच मोठी प्रगती केली.  गेल्या तीन दशकांहून अधिक काळ, तात्यासाहेबांचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून ही संस्था ग्रामीण, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाची भूमिका बजावत आहे.

आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून
• पाच माध्यमिक विद्यालये        • दोन कनिष्ठ महाविद्यालये
• एक इंग्रजी माध्यमाची शाळा    • एक मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह चालविले जात आहेत .  

● संस्थेचे ध्येय व कार्य
तळागाळातील आणि विशेषतः ग्रामीण व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करणे, हे या प्रतिष्ठानचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

डॉ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानची उद्दीष्टे -

• शैक्षणिक सुविधा व साहाय्य : गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे. तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक, विज्ञान, कृषी, तांत्रिक व पशुसंवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे.
• आरोग्य व वैद्यकीय सेवा : वैद्यकीय केंद्रे चालविणे आणि विविध शिबिरे आयोजित करून गरजू व गरीब लोकांसाठी अल्प खर्चात औषधोपचार तसेच वैद्यकीय सल्ला उपलब्ध करून देणे.
• कृषी आणि ग्रामविकास : ग्रामीण विकासासाठी तळागाळातील सर्व योजना राबविणे, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम घेणे तसेच शेतीविषयक उद्योग व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे.
• जलसंवर्धन व पाणीपुरवठा : ग्रामीण भागात पाणलोट क्षेत्र विकासाच्या योजना राबविणे आणि पाणीटंचाई असलेल्या भागात नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून साहाय्य करणे.
• आपत्कालीन मदत :  नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या आपद्ग्रस्तांना तातडीची मदत करणे

 dtnsp    | All Rights Reserved | © January2018
  • Facebook Social Icon
  • Twitter Social Icon
  • Google+ Social Icon
  • YouTube Social  Icon
bottom of page